Tuesday 27 March 2012

चिमणा आणि चिमणीची प्रेम कथा

एक होता चिमना आणि एक होती चिमणी  चिमना मोठा रुबाबदार आणि चिमणी अगदीच सुमार  तरीही एकमेकांचे जिवलग यार.
  
वेळात वेळ काढून एकमेकांशी बोलायचे
एकमेकांना चिडवायचे आणि खूप खूप हसायचे .
  
चिमणीच्या मनात एक खुलत होते गुपित
,  चिमण्या बद्दलचे प्रेम तिच्या मनाच्या कुपीत  
  
रोज रोज कारे देवाकडे प्रार्थना
 , त्याच्याही  मनात असू देत अशाच काहीशा भावना 
  
एक दिवस धीर करून तिने सगळे सांगितले
 पण तिला त्याने अगदी सहज नाकारले 
   
त्याला म्हणे असे काहीच वाटत नव्हते
त्याच्या डोळ्यात प्रेम आहे हे अगदी झूठ होते
   
का “नाही”  ह्याची बरीच कारणे सांगितली
  पण चिमणीच्या मनाला ती अजिबात  नाही पटली
  
चिमणी तशीच घरी गेलीतिकडे जाऊन खूप रडली
  काय करावे कळेना,रडू तिच्याने आवरेना 
  
चिमणीला एक उपाय सुचला , तिने चीमन्याशी अबोला धरला
  चिमण्याला मात्र ह्याचा सुधा काहीच फरक नाही पडला
  
चिमना अगदीच खुशीत होता , नवीन स्वप्ने पाहत होता
 कदाचित तो थोडा जास्तच प्रक्टीकॅल होता 
  
चिमणीने  सुद्धा  आता हसत जगायचे ठरवले
  पण एकांतातले अश्रू तिला कधीच नाही आवरले   
एकतर्फी असले तरी चिमणीचे चीमन्यावर अगदी खरे प्रेम होते
 पण कदाचित खरे प्रेम चिमण्याच्या नशिबी नव्हते
कवीअज्ञात
काय लिहू आणि कस लिहू तेच काळात नाही...कुठून सुरवात करू ते हि धड समजत नाही....आणि त्याचा विचार आला कि काळजात कस धडधड होते कि वाटत हृदय बाहेर धडकत आहे......
तो सोडून गेला आहे पण त्याची आठवण पाठ सोडत नाही.... खूप ठरवते आत्ता त्याला नाही आठवायचं....पण शेवटी वेड हे मन समजूनच घेत नाही.

आठवतात ते दिवस जेव्हा आम्ही दोघे फक्त एकमेकांसाठी जगलो होतो..पण आज...मरणाची वाट पाहतो आहे....एकमेकांच्या....का इतका तिरस्कार...तो हि त्याच्याविषयीच ज्याच्यासाठी कधी जीव द्यावासा वाटायचा.... खरच किती वाईट विचार करत होतो आम्ही एकमेकांबद्दल...पण ...जावूदे....त्याने मला फसवल याची शिक्षा त्याला देव देईलच...आणि मी फसवल्याची मला......

पण खरच कितीही  वाईट बोलले तरी आजही तितकच प्रेम आहे त्याच्यावर हे मी नाकारू शकत नाही...ती जागा कोणाला देवू हि नाही शकत... ती जागा त्याचीच आहे नेहमी आणि मी हि त्याचीच आहे कायमची ..........

नशिबात होत त्याच्या आणि माझ्या एकमेकांना भेटण अगदी अनाहूत पणे आणि अगदी तसेच भेटलो नकळत...भेटलो जेव्हा पहिल्यांदा सुचतच नव्हत काय बोलाव... शब्द तोंडात अडकल्यासारखे वाटत होते. तो समोर होता ज्याला इतके दिवस पाहण्याची आस लागून राहिली होती..खरच काहीच सुचत नव्हत...इतकी nervous कधीच झाले नव्हते मी.... हळू हळू भेटण वाढत गेल आणि एकमेकांबद्दलची ओढ हि.... नेहमी त्याच्याशीच बोलावे  अस वाटायचं. .. तो नेहमी समोर असावा...त्याचा आवाज ऐकत राहावं अस वाटायचं... खूप तत्वानाधरून बोलायचा...आपली तत्व कोणासाठी बदलणारा नव्हता तो मग माझ्यासाठी कशी बदलेल...पण माझ्यासाठी तो बदलेल असे वाटायचे मला पण मीच त्याला ओळखायला चुकले होते... माझ्यासाठी बदलला नाही तर आपल्या तत्वानासाठी त्याने मलाच सोडून दिले....................


आज एकटीच होते....ज्याला आपल मानल तो सोडून गेला...जे माझे होते ते पण मला सोडून गेले कारण मी त्याला जवळ केल होत... खरच हे एकटेपणाचे  दुख सहन नाही होत आहे मला....... मला कोणीतरी या एकटेपणाच्या दरीतून बाहेर काढा please .......  म्हणयला माणसे खूप आहेत आजूबाजूला पण त्यांच्यात असूनही मी एकटीच आहे........

कोणी देईल का साथ माझी या निष्ठुर जगात.....मला त्याला दाखवायचं आहे कि त्याच्या विना हि मी जगू शकते....मला हि मन आहे, सवेन्दना आहेत, मी हि माणूस आहे .....कोणी तरी समजून घ्या हे......कोणी तरी समजून घ्या...कोणी तरी समजून घ्या....

Tuesday 4 October 2011

Ek Prem Katha


तो वय २५,
तसा मुळचा मुंबईचा,
शिक्षणासाठी पुण्यात पग म्हणून जोश्यांकडे राहतोय.

ती वय २५,
नृत्य आणि संगीत शिकते,
आई, वडील आणि लहान भावाबरोबर पुण्यातच राहते...

तिचा नकार..
तो तिचे मन वळवण्याचा प्रयत्नात,
आजही तिच्या पाठी,
ती घराजवळ पोहचते,
पाठी तो येतच असतो,
शेवटी हतबल होवून ती "तुला नक्की हवय तरी काय? "
तो: तुझ्या प्रेमाशिवाय दुसर आहे तरी काय?
ती: माझ लग्न ठरलाय, निर्णय झालाय,
तो: तू आनंदी आहेस? नक्की?
ती: "हंम" ती होकारार्थी मन डोलावते

मागे वळतो पाठी तिचे बाबा उभे असतात,
त्यांचा गैरसमज..आणि...
सोल्यावारचा चष्मा खाली पडतो,फुटतो....
गालावरचा हात तसाच राहतो...
बाबा तिच्याजवळ येतात, दोघेही नजरे आड होतात...
तिला अखरेच बघत तो........

अंधार पडू लागतो...
रस्त्यात समोरून आलेली गाडी त्याला अस्पष्ट दिसते,...
अंगावर येणार प्रकाश आणि मग....
सवर्त्र अंधार.............
दोन महिने उलटतात
फासे हळू हळू पालटू लागतात....
दोन आठवड्यांवर लग्न, पण गेले दोन दिवस ती त्याच्याच विचार करते आहे...
तिलाही काळात नाही अस का होतंय.....
त्या दिवशी ती बराच वेळ त्या रस्त्यावर ताटकळत उभी होती....
आत्ता दिसेल नंतर दिसेल....तो दिसलाच नाही......
कॉलेजमध्येही तो बरेच दिवस आलाच नव्हता
जीवाच काही बर वाईटतर नाही न करून घेतल?
ती फार बैचैन झाली आहे...

शेवटी ती जोश्यांकडे पोहचते..
त्याचा मोठा अपघात झाल्याच कळत ...
ती त्याचा नुम्बेर घेते, घाबरतच फोने लावते...
रिंग वाजते, फोनही उचलला जातो....
 तो तिचा आवाज ओळखतो
ती रडत असते...
रादर रडत बोलत असते....
त्याच्या मनात अनेक विचार येवून जातात....
धूसर धूसर अनेक प्रश्न ठेवून जातात.....
तो काहीच बोलत नाही
दोघेही भावनाविवश होतात...
त्याला असह्य होत..तो फोने ठेवून देतो.....
ती त्या फोने कडे बघत राहते...
त्यालाच विचारत राहते " तो बोलला का नाही?"

दोन दिवसांवर लग्न..
आत्ता मात्र तिला सगळ असह्य होत चाललंय
त्याला भेटन गरजेच आहे कोणत्याही परिस्थितीत..
ती मुंबईला जाण्याचा निर्णय घेते....
त्याच्या घरी पोहचते...

तो आत्ताच पुण्याला निघ्याल्याच कळत
तातडीने पुण्याची वोल्वो पकडते....
बस मध्ये शिरते...सीट जवळ येते आणि जे पाहते त्यावर तिचा विश्वासच बसत नाही......
" तो असतो".....

काही बोलायला तिच्याकडे शब्दच नसतात..
सोल्यातून पाणी वाहू लागत...
त्याच्या शेजारी बसत ती...

तो खिशातून एक वही काढतो ..
कागदावर काहीतरी खर्वडतो...
तिच्याकडे देतो...
ती वाचते...

"हरवले मी स्वर माझे रात्रीत त्या एक "
" आहेत गोठले कंठी शब्द ते अनेक"
"भावनेत माझ्या असतील सर्व शब्द"
" कळतील का तुला बोल ते निशब्द"


भान हरपते

"कंठातले शब्द तू कंठात कोचणार का?"
"प्रेम तुझे खरे मी शब्दात मोजणार का? "

त्याला तिथेच मिठी मारते...कागद निसटून जातो..........